अखेर काटेपूर्णा धरणात बुडालेल्या इसमाचा मृतदेह आपत्कालीन पथकाने शोधून काढला
अकोला जिल्ह्य़ातील महान येथील काटेपूर्णा धरणारणाला लागुन असलेल्या जांभरुन येथीलच काशिराम पांडुरंग नांदे अंदाजे वय (52) वर्ष हे 19 जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान बुडाल्याची घटना घडली यावेळी माहीती मिळताच गावातील नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही काठावर कपडे चप्पल असल्याने याच ठिकाणावरून ते धरणात गेल्याची खात्री झाली शेवटी रात्री 11:00 वाजता बार्शीटाकळी चे पिआय शिरीष खंडारे साहेब आणी जांभरुन चे जि.प.स.गणेश झळके यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच अर्धा तासात घटनास्थळावर रेस्क्यु टीम पोहचली आणी सिन ट्रेस केला असता 25-30 फुट खोल पाणी आणी मोठ्याप्रमाणात तळाशी गाळ होता घटनास्थळावर लाईट सुविधा नसल्यामुळे आज सकाळीच 7:00 वाजता जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपली सर्च ऑपरेशन टीम चे अंकुश सदाफळे,विष्णु केवट,शेखर केवट,हर्षल वानखडे यांना रवाना केले पिआय शिरीष खंडारे सर यांचे आदेशाने सर्च ऑपरेशन चालु केले असता एका तासात तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला यावेळी घटनास्थळावर बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पिआय शिरीष खंडारे साहेब, एएसआय धनराज राऊत साहेब,हे.काॅ.प्रमोद काळपांडे साहेब,पो.काॅ. रितेश हरने साहेब,जि.प.स. गणेश झळके,आणी गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.