वारी येथील श्री. .हनुमान सागर मध्ये पाण्याच्या पातळीत वाढ जलसाठा पोहोचला 95.18 % वर

वारी येथील श्री. .हनुमान सागर मध्ये पाण्याच्या पातळीत वाढ जलसाठा पोहोचला 95.18 % वर

मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा

आज दि. २२/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता वान प्रकल्प पाणी पातळी ४११.१९ मी असून ९५.१८ % पाणीसाठा झाला आहे. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये सप्टेंबर अखेर ९५.२४ % पाणी साठा असणे निर्धारित आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या येव्या नुसार कोणत्याही क्षणी वक्रद्वार प्रचलित करून पुराचे पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे असे आवाहन वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी केले आहे.
अकोला जिह्यात प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्प परिसरात मागील बारा तासापासून मुसळधार व सतत धार पावसामुळे सद्यस्थितीत हनुमान सागर वान प्रकल्पात 95.18 % जलसाठा असल्याची माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली. यावर्षी सुद्धा श्री. हनुमान सागर पूर्णता भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण होतील यात तीळमात्र शंका नाही.तसेच शेकाडो गावातील नागरिकाच्या पिण्याची तहान भागेल यात तीळ मात्र शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news