१८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक यांना कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करा! – जिल्हाधिकारी अजित कुंभार

१८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक यांना कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करा! – जिल्हाधिकारी अजित कुंभार

०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप् त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिध् दी दिनांक २७/१०/२०२३ च् या अनुषंगाने जिल् हा निवडणूक अधिकारी कार्यालय अकोला यांच् या वतीने आयोजीत पत्रकार परिषद माहिती देण्यात आली लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन अकोला जिल् हयाचे जिल् हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम दिनांक २७ ऑक्टोबर ते दिनांक ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक यांना कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच सन २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या ०१ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल; मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल, सन २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मत्ताधिकार बजावण्यासाठी ही महत् वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्री. अजित कुंभार, जिल् हा निवडणूक अधिकारी तथा जिल् हाधिकारी अकोला यांनी केले आहे.

प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदाराकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्याचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्याच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन् यामध् ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती

याच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन् नती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यागांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तू यासाठी या कार्यालयामार्फत कालावधू द कार्यक्रम तयार करून देण् यात आलेला आहे. तृतीयपंथी व्यक्ती, शरीरव्यवसाय करणान्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी डिसेंबर महिन् यामध् ये शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकायनि सदर समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत..

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन

गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार

नाचे मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची

मतदार यादीतून वगळणी केली जाईल अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news