सर्वसामान्य व गरीब लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक!
आमदार नितीन देशमुख
हजारो संख्येने घरकुलासाठी मोर्चा नागरिकांची उपस्थिती !
केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे २०२२’ ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. सर्वसामान्य व गरीब लाभार्थ्यांना घरकुल बांधून देण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. ६९ हजार लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज क्रांती दिनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ग्रामीण भागात ६९ हजार लाभार्थी पात्र ठरविण्यात आले असून, २९ हजार अर्ज अपात्र केले आहेत. मागील मागील सहा वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरात पाच हजारांच्या आसपास घरकुले पूर्ण झाली आहेत. शासन व प्रशासनाकडून होणाऱ्या टोलवाटोलवीमुळे ग्रामीण भागातील नागरिक कुळाच्या व गवताच्या घरात राहत आहेत, यासाठी या मोर्चात 50 हजार घरकुलाचे अर्जही निवेदनासोबत देण्यात आले.