लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे रक्षाबंधनाच्या शुभपर्वावर ओम शांती केंद्राला भेट
मनोज भगत
हिवरखेड (प्रतिनिधी )
येथील ब्रह्मकुमारी ओम शांती सेवाकेंद्राला रक्षाबंधनाच्या शुभपर्वावर लोकजागर मंचचे संस्थापक अनिलजी गावंडे यांनी भेट दिली. यावेळी ब्रम्हकुमारी ओम शांती केंद्राच्या संचालिका वैशाली दीदी यांनी रक्षाबंधन करून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला सन्मान दिला. यावेळी वैशाली दीदी यांनी केंद्राच्या विविध कार्यक्रमाची माहिती श्री.गावंडे यांना दिली. त्यावेळी त्यांनी ओम शांती सेवाकेंद्राच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी नटवरलाल तापडीया,चंद्रप्रकाश भोपळे, सुभाष राऊत, अनिलकुमार भोपळे, डॉ. अभिजित उगले, मोहन वानखडे, प्रशांत ढोकणे, गणेश भोपळे, श्याम खाडे, महादेव वानखडे, भारत भोपळे, अंकित भाई, प्रणेश भाई, कैलास भाई व आदी भाईजन उपस्थित होते.