अकोट शहरात वंचितचा जनआक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

अकोट शहरात वंचितचा जनआक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

अकोट प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाची सुरूवात जिजामाता चौक रेल्वे स्टेशन येथून करण्यात आली.हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला.या जनआक्रोश मोर्चाव्दारे मागिल विस ते पंचवीस दिवसांपासून पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेल्या घासाचे नुकसान पाहुन ताबडतोब दुष्काळ जाहीर करण्यात यावा.

विधुत मंडळाने घरघुती व शेतीची वीज बिल जास्त आकारणी केल्याबद्दल व शेतकऱ्यांची शेती पंपाची लाइन नेहमी चालू ठेवण्यात यावी.तसेच शेतकऱ्यांना २५% विमा मिळावा अशा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष चरण इंगळे महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र औईंब कोषाध्यक्ष निलेश झाडे, प्रदीप वानखडे, काशीराम साबळे, समीर पठाण, आशिष रायबोले, मा.तालुकाध्यक्ष संदीप आग्रे,शरीफ राणा,मा.उपाध्यक्ष दिपक बोडखे,योगेश आग्रे, शत्रुघ्न नितोने, सचिन सरकटे, संतोष इंगळे, सुरज सरकटे,मनोहर गाढे, मंदा कोल्हे, सुनिता हिरोळे,लता कांबळे, नितीन वाघ,धीरज सिरसाट, निखिल गावंडे, सुभाष तेलगोटे, दिनेश सरकटे,ललिता तेलगोटे, पांडुरंग तायडे, विनोद आस्वार, विशाल आग्रे, विशाल तेलगोटे, संजय पुंडकर,सुनिल घनबहादुर, सदानंद सिरसाट, भाऊराव धांडे स्वप्निल वाघ, युवराज मुरकुटे, नागोराव सरकटे, विनायक भरक्षे, उमेश खंडारे, अर्चना वानखडे, दिनेश धांडे,अमन गवई,ईश्वरदास झासकर, निरंजन गावंडे, भुषण रंधे, बुद्धभूषण गावंडे, भिमराव पळसपगार, मुस्ताक शहा, अभिमन्यू धांडे, रामाभाऊ भास्कर, प्रशांत मानकर,विशाखा आग्रे नंदू पवार, सतीश घनबहादुर, अशोक सुरतने , सुनिल वाकोडे ,विकी काळे,सुगत वानखडे, अशोक इंगळे,चेतन कडू,मजाहीन खान यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news