भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार,
वाशिंबा नजीकची घटना.
बोरगाव मंजू
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नजीक भरधाव कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार झाले,हि घटना १८ मार्च रविवारी सकाळी दरम्यान घडली, पवण गायकवाड, वैभव गवळी असे अपघातातील मृतांची नावे आहेत,
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवण पिराजी गायकवाड वय २६ व त्याचा मित्र वैभव विजय गवळी वय २४ हे दोघे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच ३० बी आर ३०३३ शिवनी येथुन अमरावती येथे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जात होते, दरम्यान अकोला कडून पाठीमागून अमरावती कडे. जाणारी कार क्रमांक एम एच १९ इ ए २२९७ ही भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरच्या मोटारसायकल स्वारास जबरदस्त धडक दिल्याने दुचाकीस्वार पवण गायकवाड व वैभव गवळी दोन्ही राहणार शिवणी अकोला हे दोघेही गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाणेदार मनोज केदारे, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे, हेडकॉन्स्टेबल नितेश तायडे, अरुण गोपनारायण,गिरीश विर, यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अकोला येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले, दरम्यान पोलिसांनी कार सह चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या सह पोलीस करत आहेत