संग्रामपूर येथील पत्रकारांनी दिले तहसीलदारां मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन 

पत्रकारांविषयी बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी खामगांव येथील डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांच्यावर कारवाई करा
 संग्रामपूर येथील पत्रकारांनी दिले तहसीलदारां मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन 
संग्रामपूर प्रतिनिधी:मागील ४ ते ५ दिवसांपासून काहीही कारण नसताना खामगाव शहरातील स्त्रिरोगतज्ञ डॉ. पांडुरंग गुलाबराव हटकर यांनी अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच पत्रकार बांधवांना वैयक्तीकरित्या तसेच स्वतःच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर व फेसबूकवर  दैनिक सत्यप्रतचे संपादक  आनंद गायगोळ यांची तसेच पत्रकारांची बदनामीकारक मजकूर  टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
त्या बोगस पत्रकाराच्या दिवाळी पॉकीटाची चर्चा !  दिवाळी भेट दिली नाही म्हणून बदनामीकारक वृत्त प्रसिध्द केले, पत्रकार आनंद गायगोळ विरूध्द डॉ. पांडुरंग हटकर यांची तक्रार अशा मथळ्याखाली बातमीस्वरूपात पोस्ट तयार करून सोशल मिडीयाचा गैरवापर करीत पत्रकारांच्या बदनामीचा प्रयत्न केला आहे. याशिवाय पत्रकारांच्या बाबतीत बराचसा चुकीचा व बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला आहे. त्यांनी व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये नमुद मजूकर पुर्णपणे खोटा असून वास्तविक पाहता पत्रकार आनंद गायगोळ हे दिवाळी जाहीरातसाठी डॉ.हटकर यांच्याकडे कधीही गेलेले नाहीत. तसेच डॉ.हटकर यांची कोणतीही बातमी त्यांनी प्रकाशित केली नाही. परंतु तरी सुध्दा डॉ.हटकर हे बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो डॉ हटकर हे म्हणतात पत्रकार आनंद गायगोळ यांनी विस दिवसांपूर्वी दवाखान्यात येऊन जाहिरात मागीतली होती मग विस दिवसांपूर्वी व अद्यापही पोलीसात का तक्रार दिली नाही तसेच जाहिरात मागतांनाचा दवाखान्यातील सि.सि.टि.व्ही चे व्हिडिओ सार्वजनिक का करत नाहीत.अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर डॉ हटकर देत नाहीत डॉ हटकर फक्त पत्रकार आनंद गायगोळ यांना बदनाम करत आहे तसेच भविष्यात देखील  डॉ. हटकर यांचेकडून  सोशल मिडीयाचा गैरवापर करून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होवू शकतो याची देखील दखल घ्यावी.
           सोशल मिडियाचा गैरवापर करून पत्रकारांची बदनामी करणार्‍या डॉ.पांडुरंग गुलाबराव हटकर यांची चौकशी करून त्यांच्याविरूध्द सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा पत्रकारा बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,अश्या आशयाचे निवेदन सुनील मुकुंद,शेख रफिक, काशिनाथ मानकर, अमोल ठाकरे, विवेक राऊत, विठ्ठल निंबोळकार, पुंडलिक खानझोडे, सचिन पाटील, नारायण सावतकार, स्वप्निल देशमुख, ज्ञानेश्वर दांदळे, दयालसिंग चव्हाण, अनिल सिंग चव्हाण, अब्दुल शेख, भगवान पाखरे, संतोष आगलावे, रवींद्र धर्माधिकारी, शे.रफीख,शेख कदीर, मंगेश टाकसाळ, रामेश्वर गायकी पिन्टु दाभाडे यांच्या सह मोठ्या संख्येने निवेदन देतांना पत्रकार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news