डॉ. अभय पाटील यांचा विजय प्रहार करणार प्रहार जनशक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षाने जाहीर केला पाठींबा

डॉ. अभय पाटील यांचा विजय प्रहार करणार प्रहार जनशक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षाने जाहीर केला पाठींबा


अकोला– लोकसभा निवडणुकीची देशभरात,राज्यात रणधुमाळी सुरु झाली आहे. पूर्वी महायुतीतील घटक पक्षअसलेला प्रहार जनशक्ती पक्ष वेगवेगळ्या भुमिका जाहीर करते आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे. महायुती आणि महाविकास आघाड्याकडून प्रचारास जोमाने सुरुवात झाली आहे.यामध्ये आता प्रहार जनशक्ती पक्षाने अकोल्यातही आपली भूमिका जाहीर केली आहे. अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकत्यांची बैठक झाली असून कार्यकर्त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना जाहीर पाठींबा दिला आहे तसा ठराव आज घेऊन उद्या पक्षाध्यक्ष बच्चू कडू यांना देणार आहेत व त्यांची सही झाल्यावर डॉ अभय पाटील यांना देणार असल्याचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महायुतीने अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमदार बच्चू कडूनी खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या आधीच जाहीर केली असून आपला उमेदवारउभा केला आहे. अकोल्यात मात्र आपला उमेदवार उभा न करता महा विकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.भाजपा हीं हिटलरशाही प्रमाणे वागते. आमदार बच्चू कडूनी पालकमंत्री असताना अकोला शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही अकोल्यात भाजपा प्रहार जनशक्ती पार्टीला गृहीत धरते.प्रहार च्या कोणत्याही कार्यकर्त्याला शासकीय, किंवा निम शासकीय समितीवर साधे सदस्य म्हणून घेतले नाही. यांबाबत भाजपा अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांना वारंवार प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली मात्र हिटलर प्रमाणे धुडकावून लावले आहे. अमरावतीत भाजपा प्रहार पार्टी च्या अध्यक्षावर बिनबुडाचे आरोप करीत अपमान करीत आहे तर अकोल्यातही भाजपा विचारात घेत नाही त्यामुळे प्रहार जन शक्ती पार्टीचा डॉ अभय पाटील यांना पाठींबा असल्याचे आज जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आमचा नेता प्रामाणिक आहेत.तर डॉ अभय पाटील हे लोकांचे प्रश्न सोडवतात. भाजपा ने विकास केला नाही,महान, कापसी सारखी ठिकाणे विकसित केले नाही. भाजपा प्रहारला गृहीत धरतात त्यामुळे अकोल्यात प्रहारचे ६० ते ७० हजार मतदार आहेतत्यामुळे डॉ अभय पाटील यांचा विजय प्रहार करणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news